Posts

10 वी - मराठी (रसग्रहण)

जनीं आर्जव तोडू नये । पापद्रव्य जोडू नये । पुण्य मार्ग सोडू नये । कदाकाळी ॥ आशयसौंदर्य - वरील काव्यपंक्ती ही 'उत्तमलक्षण' या कवितेतील आहे. या कवितेचे कवी संत रामदास आहेत. उत्तमलक्षण ही कविता 'श्रीदासबोध' या ग्रंथातून घेतली आहे. या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना 'काय करावे' आणि 'काय करू नये' याबाबत संत रामदासांनी मार्गदर्शन केले आहे. काव्यसौंदर्य  - समाजात राहत असताना समाजातील प्रत्येक व्यक्तीशी आदर्श वर्तन केले पाहिजे. वाईट मार्गाचा अवलंब करून धनसंपत्ती मिळवू नये. जीवन जगत असताना पुण्य मार्ग कधीही सोडू नये. नीतीधर्माने वागणे हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. तो आपण स्वीकारला पाहिजे. हा संदेश संत रामदास यांनी या काव्यपंक्तीतून दिलेला आहे. भाषिक वैशिष्ट्ये  - 'उत्तमलक्षण' ही शांत रसाचा अनुभव देणारी रचना आहे. या रचनेत यमक साधणारे शब्द आलेले आहेत. जसे - 'भांडो नये - तंडो नये'. या कवितेचा रचनाप्रकार ओवी हा आहे. अपकीर्ती - सतकीर्ती व सांडावी - वाढवावी या विरोधी शब्दांमळे  काव्यपंक्...

10 Th Geography

10 th geo.

इयत्ता 10 वी - मराठी (पद्य विभाग)

* कविता- उत्तम लक्षण    * कवी - संत रामदास * काव्यसंग्रह - श्री दासबोध  * कवितेचा सारांश /विषय - संत रामदास यांनी 'उत्तम लक्षण' या कवितेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. * कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे - मला ही कविता आवडली, कारण आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगणारी ही संत रामदासांची उत्तम रचना आहे. दैनंदिन जीवनात काय करावे व काय करू नये हे त्यांनी अनेक उदाहरणांवरून सांगितले आहे. आपले आचरण उत्तम असावे, विवेकाने वागावे, जेणेकरून आपली लोकप्रियता वाढेल. असा संदेश कवी संत रामदास यांनी या कवितेतून दिला आहे. कविता- वस्तू कवी- द. भा. धामणस्कर  काव्यसंग्रह - भरून आलेले आकाश कवितेचा सारांश/ विषय- निर्जीव वस्तूंनाही भावना असतात हे समजून त्यांच्याशी वागावे, त्यांना जपावे. या भावना कवी द. भा. धामणस्कर यांनी व्यक्त केल्या आहेत.  कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे- ही कविता म्हणजे मुक्तछंद काव्याचा प्रकार असून ही कविता मला खूप आवडली. ज्या वस्तू आपण दीर्घकाळ वापरतो त्या वस्तूंशी आपले एक भावनिक नाते तयार झालेले असते. वस्तू निर्जीव असल्या तरी त्यांनाही भावना आहेत, असे समजून आ...